उस्मानाबाद लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैंसभी दिखाएं
सेवानिवृत्तीच्या शेवटच्या रेल्वे प्रवासातही जपली सहप्रवाशांनी मैत्री...
खासदार ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या या समितीवर निवड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वीकारले पत्र
प्रा. शाळा, कंटेकूर येथे ओम शांती ओम तर्फे नशामुक्त भारत अभियान शपथ  कार्यक्रम
मुरूममध्ये भव्य ऐतिहासिक तिरंगा रॅली संपन्न; सहा हजारांहून अधिक विद्यार्थी, माजी सैनिक व नागरिकांचा अभूतपूर्व सहभाग.
सोनाली बिराजदार मुंबई पोलीस तर नेताजी पवार महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये भरती
विधान परिषद आमदार बसवराज पाटील यांचा सत्कार; महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारूढ स्मारकासाठी निवेदन
 *पुणे येथे महाराणी येसुबाई जयंती व कारगिल विजय दिनाचे आयोजन ;*
मुरूममध्ये सहकार प्रशिक्षण शिबिर संपन्न; पतसंस्था व बँकांच्या कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग
कमवा व शिका योजनेत साताऱ्यात बैलाविना बेंदूर साजरा
क्रांतिवीर संकुलात स्वर्गीय अजित दादा यांची जयंती संपन्न
जागतिक पातळीवर रोटरी हीच एकमेव निस्वार्थी सेवाभावी संस्था...शरण पाटील
रुपाली शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद बालगृहातील मुलांना शालेय साहित्याचे वाटप...
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात करिअर कट्टा विद्यार्थी संसद  विद्यार्थी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी
CSIR JRF-NET परीक्षेत देशात 21 वा क्रमांक; श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या ओमकार चव्हाणचा गौरव
महाबळेश्वरच्या विकासाकडे लक्ष देण्याची पर्यटकांची मागणी
​शून्यातून विश्व निर्माण करणारे प्राचार्य डॉ. राजेंद्र मस्के यांचा सायकल ते प्राचार्य असा प्रेरणादायी जीवनप्रवास...  ​आयुष्याच्या वाटेवर जेव्हा परिस्थिती विरोधात असते, तेव्हा दोनच मार्ग असतात एक तर परिस्थितीसमोर गुडघे टेकायचे किंवा त्या परिस्थितीला आपल्या संघर्षाच्या जोरावर नमवायचे. प्राचार्य डॉ. राजेंद्र विश्वंभरराव मस्के यांनी दुसरा मार्ग निवडला आणि आज ते केवळ एक प्राध्यापक, प्राचार्य नाहीत, तर हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एक चालते-बोलते प्रेरणादायी व्यक्तिमत्वच ठरले आहेत. आयुष्यात यश मिळवण्यासाठी मार्ग सुकर असावा लागतो असे नाही, तर तो मार्ग आपल्या जिद्दीने आणि कष्टाने बनवावा लागतो. आजच्या तरुणाईसाठी संघर्षाची एक जिवंत यशोगाथा म्हणजेच डॉ. राजेंद्र मस्के होत. ​बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अंतरवाली बुद्रुक या छोट्याशा गावात १२ जून १९६६ रोजी एका शेतकरी कुटुंबात राजेंद्र मस्के यांचा जन्म झाला. १२ एकर शेती, पण निसर्गाची अनिश्चितता आणि गरिबीचा वारसा. वडिलांचे शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत. घरची परिस्थिती पाहता राजेंद्र यांच्या शिक्षणाचा प्रवास अत्यंत खडतर होता. चौथीपर्यंत आजोळी, ५ वी ते ७ वी साठी रोज ४ किलोमीटर पायपीट आणि ८ वी ते १० वी साठी पुन्हा ४ किलोमीटर पायी प्रवास. पायाला पडलेले फोड आणि डोळ्यांत असलेले शिक्षणाचे स्वप्न, अशा द्वंद्वातून त्यांनी जिद्दीचे बीज आणि संघर्षाचा अंकुर आयुष्यात फुलवला. ​दहावी उत्तीर्ण झाल्यावर जेव्हा वडिलांनी आर्थिक टंचाईमुळे शिक्षणास नकार दिला, तेव्हा राजेंद्र मस्के खचले नाहीत. त्यांनी आजोळी जाऊन शिक्षणाचा ध्यास धरला. जालना येथील जे. ई. एस. महाविद्यालयात प्रवेश घेतला. रोजचे १२ किलोमीटर म्हणजे ये-जा करण्याचे २४ किलोमीटर अंतर. १३५ रुपयांत घेतलेली ती जुनी सायकल त्यांची एकमेव सोबती होती.​ तो सायकल प्रवास आणि नियतीचा एक धडाच ठरला.  एकदा त्यांची सायकल पंक्चर झाली आणि खिशात पंक्चर काढण्यासाठी पैसे नव्हते. आजूबाजूला मदतीला कोणी नव्हते, अशा वेळी त्यांनी ती सायकल खांद्यावर घेतली आणि भर उन्हात मैलोन्मैल चालत गाव गाठल्याचा प्रसंग त्यांनी एकदा चर्चा करताना सांगितला. त्या दिवशी त्यांना जाणवले की, आयुष्यात संकटे कितीही मोठी असली तरी थांबणे हा पर्याय नाही, तर चालत राहणे हाच खरा यशाचा मार्ग आहे. ​अध्यापन ते राष्ट्रसेवेचा वारसा सेवानिवृत्तीपर्यंत त्यांनी जपला. एम. ए. राज्यशास्त्र, एम. फिल आणि 'महाराष्ट्राच्या राजकारणातील जमातवादाचा प्रभाव : एक अभ्यास' या विषयावर पीएच.डी. पूर्ण करून १९९२ मध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून कारकीर्द सुरू केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रवासात त्यांनी उपप्राचार्य, शिस्तपालन समितीचे अध्यक्ष, वस्तीगृह समितीचे अध्यक्ष आणि शेवटी सप्टेंबर २०२५ मध्ये प्रभारी प्राचार्य म्हणून जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. ​विशेष म्हणजे, १९९८ ते २०२२ या २४ वर्षांच्या दीर्घकाळात त्यांनी एन.सी.सी. अधिकारी म्हणून देशाला शिस्तबद्ध तरुण दिले. 'एकता आणि अनुशासन' हे केवळ ब्रीदवाक्य न ठेवता, त्यांनी ते आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले. देहरादून येथे झालेल्या एन.सी.सी. कॅडेट्सच्या स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करताना देशातून दुसरा क्रमांक मिळवून देणे, ही त्यांच्या कारकिर्दीतील सुवर्णगाथा आहे. ​​प्राचार्य डॉ. मस्के आजच्या तरुणाईला बजावून सांगतात, ​"शासकीय नोकऱ्यांच्या मागे धावताना स्वतःची कौशल्ये विसरू नका. बेरोजगारी ही केवळ एक समस्या नसून ती संधीची कमतरता आहे. तंत्रज्ञान आणि व्यावसायिक शिक्षणाची कास धरा. तुमच्यातील जिद्द हीच तुमची सर्वात मोठी पदवी आहे. याद राखा, सायकलवरून प्रवास करणारा मुलगा जर महाविद्यालयाचा प्राचार्य होऊ शकतो, तर तुम्ही आकाश का गाठू शकत नाही ?" परिस्थितीवर मात करण्याची जिद्द हवी, कष्टाच्या घामात यशाची शुद्ध हवी! डिग्रीच्या कागदांपेक्षा, अनुभवाच्या अनुभवांना महत्त्व द्या; कारण काळ कितीही बदलला तरी, कष्टाला पर्याय नाही. यश हे रस्त्यावर पडलेले नसते, ते संघर्षाच्या खडतर वाटेवर शोधावे लागते. ज्याप्रमाणे डॉ. मस्के यांनी आपल्या आयुष्यातील संकटांना शिस्तबद्धतेने आणि संयमाने हाताळले, तसेच प्रत्येक युवकाने आपल्या आयुष्याचे शिल्पकार स्वतः बनावे.  ​शब्दांकन: प्रा. डॉ. महेश मोटे संशोधन मार्गदर्शक तथा समन्वयक, राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर विभाग, श्री माधवराव पाटील महाविद्यालय, मुरूम.
बीरभूम येथे अप्पर पोलीस अधीक्षकपदी निलेश गायकवाड रुजू
ज़्यादा पोस्ट लोड करें कोई परिणाम नहीं मिला